मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Geetanjali Rabindranath Tagore यांच्या Nobel prize विजेत्या काव्यसंग्रहातील 42 व्या कवितेचा मराठी भावानुवाद

Close up of Rabindranth Tagore in vertices frame with bluish tone and name over printed on it
Rabindranath Tagore pic courtesy Google

 Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

Geetanjali Rabindranath Tagore – ४२ वी कविता Morning Sea of Silence चा मराठी भावानुवाद 

 

  • गीतांजली लेखन काला विषयी
  • गीतांजली काव्यसंग्रह आध्यात्मिक भाष्य करतो व हे भाष्य थेट नसून between the lines आहे. 
  • १९१० साली टागोरांनी मूळ बंगालीत लिहिलेला गीतांजली हा काव्यसंग्रह आहे .
  • १९१२ मधे टागोरांनी गीतांजलीला स्वतः इंग्रजीत भाषांतरीत केले.
  • १९१३ मधे  या इंग्रजी भाषांतरीत गीतांजलीस  साहित्याचे ‘नोबल पारितोषिक’ देवून गौरविण्यात आले. 

 

Nobel Prize for literature 1913 

गीतांजली काव्यसंग्रहासाठी नोबल मिळवणारे रविंद्रनाथ टागोर हे 

पहिले अयुरोपिय

पहिले आशियाई 

पहिले भारतीय

आहेत. 

 

Rabindranath Tagore Geetanjali काव्यसंगहाचा उद्देश 

गीतांजली काव्यसंग्रहाचा उद्देश “I am here to sing thee songs” अर्थात ” मी इथे तुझी गाणी म्हणायला आलो आहे !”. या वाक्यातून स्पष्ट होतो. “तुझी” हे संबोधन परमेश्वरा साठी आहे . यातून काव्य रसातून ‘भक्ती’ हा मानवी जीवनाचा परमोच्च हेतू रविंद्रनाथ टागोर सूचित करतात.  

तशी महाराष्ट्रात काव्य रसातून भक्ती ची परंपरा ज्ञानेश्वर -तुकाराम यांनी टागोरांच्या ४०० वर्षे आधीच प्रस्थापित केलिय पण टागोर हे  पाश्चात्य व भारतीय संस्कृती चा दुवा मानले गेले. रविंद्रनाथ टागोरांनी भारतीय अध्यात्माची काव्यमय ओळख पाश्चात्य जगताला करून दिली. 

प्रसिद्ध मराठी भावगीताची आठवण:

“I am here to sing thee songs”. या ओळी सुधीर फडकेंनी गायलेले प्रसिद्ध मराठी गीत “तुझे गीत गाण्यासाठी सूर राहू दे” ची आठवण करून देतात.

 

About Poem 48 of Gitanjali ‘Morning Sea of Silence’

आपल्या मित्रांसोबत परमेश्वराचा किंवा परमसुखाचा शोध घेत डोंगर दर्यातून झप झप पावले टाकत निघालेला काव्य नायक वाटेतल्या निसर्गाला पाहून मोहित होतो व ईश्वरीय सौंदर्याची अनुभूती घेत मागे रेंगाळतो . मित्र परमसूख शोधत फार दूर पुढे निघून जातात पण मागे थांबलेल्या नायकाला निवांत क्षणांमधे निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गा मधेच ईश्वराचे दर्शन होते. असे चित्रण रविंद्रनाथ टागोरांनी त्यांच्या या Nobel पारितोषिक विजेत्या काव्यसंग्रहातील ४२ व्या कवितेत केले आहे . या कवितेचे मला भावांतर pinga9 च्या वाचकांसाठी खालील प्रमाणे.

पहाटेचा शांतीसागर

 (गीतांजली /४८ रविंद्रनाथ टागोर)

 

पहाटेच्या निरव शांततेचा सागर पक्षांच्या किलबिलाटाने शहारला.

रस्त्या लगतच्या झाडांची इवली फुले आनंदून गेली.

वर सोन्याचे लोट आकाशातल्या ढगांच्या कडांवरून ओसंडत होते.  

पण आम्ही तिकडे  ढुंकून पाहिले नाही 

कारण आम्ही झप झप चालत दूर निघालो होतो..निमूट…न हसता.. न बोलता.

आता मध्यान्हीचा सूर्य तळपला आणि बदकांचा कळप पिंपळाच्या थंड सावलीत विसावला.

एक धनगराचं पोर विशाल वडाच्या  बुंध्याला डुलकी घेत बसलं होतं.  

मी ही मग जलाशयाच्या काठावरच्या हिरव्या गवतावर निवांत पडलो. 

माझे सोबती माझ्याकडे पाहून तुच्छतेने हसले व पुढे चालू लागले.. 

क्षितिजाच्या निळसर धुक्यात ते अदृश्य होत गेले. त्यांनी अनेक डोंगरमाथे व कुरणे पार केली.

दूरच्या त्या अनोळखी देशांना ओलांडत ते पुढे गेले… झप झप… सगळेच ..!

-रवींद्रनाथ टागोर 

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment