शशी थरूर: राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा!
Shashi Tharoor हे नाव भारतीय राजकारणात विचारवंत, मुत्सद्दी आणि वक्तृत्वाच्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जाते. परराष्ट्र धोरण, जागतिक संबंध आणि भारताची वैश्विक प्रतिमा या विषयांवर त्यांचे मत कायमच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी राहिले आहे. अलीकडेच ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत — आणि यावेळी त्याचे कारण थोडे वेगळे आहे.
ऑपरेशन सिंदूर’नंतर जागतिक दौऱ्यावर थरूर
भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानप्रेरित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि भारताच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी सात उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळे नियुक्त केली. Shashi Tharoor यांना अमेरिकेतील दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या १० सदस्यीय खास प्रतिनिधीमंडळाचे( Global outreach delegation)नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.थरूर यांच्यासह या प्रतिनिधीमंडळात माजी राजदूत, विविध पक्षांचे खासदार आणि सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. हे प्रतिनिधी पाच प्रमुख राजधानी शहरांमध्ये भारतीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे, हे प्रतिनिधीमंडळ ‘बाय-पार्टिसन’ म्हणजे सर्वपक्षीय स्वरूपाचे असणार आहे.
काँग्रेसकडून वगळले… तरीही केंद्राकडून विश्वास
या विषयात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे — काँग्रेसने अमेरिकेच्या दौऱ्यासाठी ज्या खासदारांची यादी दिली होती, त्यात Shashi Tharoor यांचे नाव नव्हते. तरीही, केंद्र सरकारने थरूर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व सोपवले. यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. कॉग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर “निष्कपट नसल्याचा” आरोप केला असून, शशी थरूर यांचा समावेश हा एकतर्फी निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, भाजपने काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “राहुल गांधींना भारताच्या बाजूने बोलणारे नेते सहन होत नाहीत.”
थरूर यांची प्रतिक्रिया: राष्ट्रीय हित सर्वांत महत्त्वाचे
या सगळ्या गोंधळात Shashi Tharoor यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. “राष्ट्रीय हिताच्या वेळी मी मागे राहणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. पक्षातर्गत मतभेद असले तरी, भारताच्या प्रतिमेसाठी जागतिक व्यासपीठावर उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
निष्कर्ष
Shashi Tharoor यांचे हे पाऊल भारतीय राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, राष्ट्रीय हितासाठी पुढे येणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आणखी बळकट झाली आहे. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांची वक्तृत्वकौशल्ये आणि मुत्सद्देगिरी नक्कीच उपयोगी पडतील, यात शंका नाही.







