मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- कसा सापडला स्वयंभू कसबा गणपती- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास..

राजमाता जिजाबाई यांनी स्थापन केला होता पुण्यातील कसबा गणपती. मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास 

मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा

राजमाता जिजाबाई आणि लहान शिवाजी यांचे पुण्यात आगमन हा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इ.स. 1637 मध्ये, अंदाजे सात वर्षांचे शिवाजी आपल्या आई जिजाबाईंसोबत पुण्यात आले. त्यापूर्वी ते काही वर्षै विजापूर येथे शहाजी राजें सोबत राहत होते. शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या नोकरीत होते .याच वेळी पुणे भागात त्यांनी आपली स्वतःची जहागीर स्थापन केली होती.
राजमाता जिजाऊ व शिवाजीराजे यांना पुनवडी (पुणे) येथे पाठविण्याचा शहाजीराजेंनी मुत्सद्दी विचार केला होता. स्वराज्याचा पायंडा घालणे, स्वतःच्या जहागीरीची व्यवस्था लावणे, लहान शिवाजीचे भवितव्य उज्ज्वल करणे आणि कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही कारणे त्यामागे होती.जिजाबाई आणि लहान शिवाजी पुण्यास आले तेंव्हा पुणे हे पुणवडी नावाचे एक छोटेसे गाव होते.इथेच शहाजींनी जिजाऊ आणि शिवबा साठी लालमहाल बांधला होता.

कसबा गणपती: जिजाबाईंची दिव्य दृष्टी

पुण्यात आल्यानंतर जिजाबाईंना एका दिव्य अनुभवाचा साक्षात्कार झाला. त्यांना आणि एका गणेशभक्त ठकार कुटुंबाला एकाच वेळी स्वप्नादेश झाला, ज्यात जमिनीत पुरलेली एक गणपती मूर्ती असल्याचे सांगितले गेले. जिजाबाईंनी ताबडतोब “देव शोधा!” असा आदेश दिला आणि जहागिरीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे परिसरात शोध सुरू केला.

थोड्याच अवधीत, सध्याच्या कसबा पेठ परिसरात खणल्या गेलेल्या जमिनीतून एक अद्भुत स्वयंभू गणपती मूर्ती प्रकट झाली. ही मूर्ती तांदळा स्वरूपात होती, म्हणजेच तिला हात-पाय सारखे अवयव नसून ती एक मुखवट्यासारखी होती – पुण्यात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती आहे.

श्री कसबा गणपती मंदिराची स्थापना

सापडलेल्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी जिजाबाईंनी तेथे एक मंदिर बांधण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे इ.स. 1636 च्या सुमारास पुण्याच्या कसबा पेठ परिसरात श्री कसबा गणपती मंदिर अस्तित्वात आले. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मण कुटुंबांपैकी ठकार कुटुंबाने या मूर्तीची मूळ स्थापना केली.

कसबा गणपतीचे वैशिष्ट्य आणि महत्त्व

ग्रामदैवता: हा गणपती पुण्य शहराची ग्रामदेवता (ग्रामदैवता) म्हणून ओळखला जातो आणि पुण्यातील सर्वात मानाचा आदरणीय गणपती मानला जातो.कसबा गणपती मंदिर हे एक छोटेखानी पण सुबक दोन मजली असे मंदिर आहे. संपूर्ण मंदिर सागवानी लाकडाचे आहे व त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे

शिवाजी महाराजांची श्रद्धा: ऐतिहासिक संदर्नुभानुसार, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध मोहिमेवर निघण्यापूर्वी कसबा गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणूनच या गणपतीला ‘जयति गणपति’ असेही संबोधले जाते.

सांस्कृतिक परंपरा: आजही पुण्यातील लोक कोणतेही मंगल कार्य (विशेषतः लग्न) करण्यापूर्वी येथे पहिली अर्पणपत्रिका ठेवतात आणि कार्य संपल्यानंतर वधू-वराला त्वरित येथे दर्शनासाठी आणले जाते.

सार्वजनिक उत्सवात स्थान: पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपती मंडळाला मानाचे पहिले स्थान आहे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीची पालखी अग्रभागी असते.

ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व

जिजाबाईंनी कसबा गणपतीची स्थापना केवळ एक धार्मिक कृती म्हणून केली नाही, तर त्यामागे एक राजकीय आणि सांस्कृतिक संदेशही होता. शहाजीराजे भोसले यांनी पुण्याची जहागीर मिळवल्यानंतर तेथे आपल्या पतीच्या सत्तेचा प्रभाव वाढविण्यासाठी, तसेच नव्याने वसाहत सुरू करणाऱ्या लोकांना एक धार्मिक केंद्र प्रदान करून आश्वस्थ भाव निर्माण करण्यासाठी हे मंदिर महत्त्वाचे होते.

जिजाबाईंची दूरदृष्टी यामध्ये स्पष्टपणे दिसून येते – त्यांनी केवळ एक देवस्थानच स्थापन केले नाही तर पुण्य शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचा एक महत्त्वाचा पाया घातला. आजही कसबा गणपती पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग बनून आहे.

निष्कर्ष

राजमाता जिजाबाई आणि लहान शिवाजी यांचे पुण्यात आगमन आणि कसबा गणपतीची स्थापना ही केवळ ऐतिहासिक घटना नसून मराठा साम्राज्याच्या उदयाची पूर्वसूचना होती. जिजाबाईंनी केलेले हे कार्य केवळ धार्मिक नसून राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे होते, ज्याने भविष्यातील स्वराज्य स्थापनेचा मार्ग मोकळा केला. आजही कसबा गणपती मंदिर पुण्याच्या ऐतिहासिक वारस्याचे आणि जिजाबाईंच्या दूरदृष्टीचे एक सजीव स्मारक आहे. ब्रिटिश शासन काळात स्वराज्याची गर्जना याच पुण्यातून लोकमान्य टिळकांनी केले होती. माता जिजाऊंनी स्थापन केलेल्या कसबापेठेतील गणपतीचा आशीर्वाद यामागे नक्कीच होता

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment