भारतीय राष्ट्र गीताचा इतिहास व मूळ स्वरूप
१९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तीन वर्षांनी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली गीताचे पहिले कडवे भारतीय राष्ट्रगीत म्हणून मान्य केले गेले. असे करताना मूळ बंगाली गीताचे हिंदी भाषेत भाषांतर केले गेले व अशाप्रकारे भारतीय राष्ट्रगीत “जन गण मन” अधिकृत रित्या 24 जानेवारी 1950 रोजी संमत झाले.

National Anthem – Original : आजचे आपले हिंदी राष्ट्र गीत मूलतः रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेत लिहिले होते व ते पाच कडव्यांचे दीर्घ गीत होते. आपण जे राष्ट्रगीत गातो ते या मूळ गीताचे पहिले कडवे आहे. हे मूळ गीत काय होते व या गीता संदर्भात रवींद्रनाथ टागोर यांच्यावर ब्रिटिश धार्जिणे पणाची टीका का झाली होती यासंदर्भात ये लेखात माहिती घेवू.
मूळ गीत सादरीकरण : कालक्रम
१९०५
सर्व प्रथम १९०५ साली रविंद्रनाथ टागोर यांनी हे गीत बंगाली भाषेत लिहिले होते.
१९११ डिसेंबर २७
त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले “जन गण मन” हे गीत पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले गेले.कलकत्याच्या Bow Bazar street वरील ‘भारत सभा’ या एक मजली इमारतीत हे अधिवेशन पार पडले होते. इथून पुढे हे गीत देशभरात लोकप्रिय झाले.
१९१९ फेब्रुवारी २८
१९१९ साली टागोरांनी स्वतः मदनापल्ली आंध्र प्रदेश येथील बेसेंट थिओसाॅफिकल काॅलेज मधे हे गीत गायले होते. या काॅलेज च्या शिक्षक गणांना हे गीत एवढे आवडले की त्यांनी गीताचे इंग्रजी भाषांतर करून ते काॅलेजची दैनिक प्रार्थना म्हणून स्वीकारले व आजतागायत नीत्यनेमाने ते गीत या काॅलेजमधे प्रार्थना म्हणून गायले जाते.
मूळ राष्ट्र गीत – २४ जानेवारी १९५०
अखेर भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाने या गीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली.
रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ राष्ट्र गीता मधे पाच कडवी(Stanza)आहेत पण यातील पहिले एक कडवेच राष्ट्र गीत म्हणून स्वीकारले गेले आहे.
राष्ट्रगीतातील पहिली ओळ सामान्य नागरिकाचे नायकत्व सांगते
राष्ट्रगीताची पहिली ओळ व शब्दागणिक अर्थ
राष्ट्रगीताची पहिली ओळ व शब्दागणिक अर्थ – National Anthem – Original
"जन गण मन अधिनायक जय हे | भारत भाग्य विधाता"
टागोरांचे मूळ पाच पदांचे गीत खालीलप्रमाणे आहे.
खालील मूळ गीतातील लाल अक्षरातील पहिले पद आपण राष्ट्रगीत म्हणून गातो. त्याखालील ४ पदे मिळून हे मूळ गीत आहे
जन गण मन
Controversy : या गीता संदर्भात टागोरांवर ब्रिटिश हुजरेगिरी चा आरोप
सन १९११ रोजी ब्रिटिश किंग जॉर्ज 5th हा भारत दौऱ्यावर आला होता. या राजाचे भारतात अतिशय शाही इत्मामात स्वागत झाले होते. मुंबई च्या ज्या धक्क्याला किंग जॉर्ज 5th चे जहाज लागले होते तेथे या ब्रिटिश राजाच्या स्वागता प्रित्यर्थ ‘Gate way of India ‘ ची उभारणी केली गेली होती.राजाच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोर यांनाही आमंत्रित केले गेले होते व या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांनी त्यांचे ‘जन गण मन’ हे गीत गायले होते.पूढे काही लोकांनी टागोरांनी हे गीत खास किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले प्रशंसा गीत होते असे म्हणून टागोरांनी ब्रिटिश राजाची हुजरेगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला . विशेष करून गीतातील”अधिनायक” हा शब्द किंग जॉर्ज 5th साठी वापरण्यात आला आहे असे या आरोपात म्हटले गेले होते.या आरोपात पुढे असेही म्हटले गेले होते की या हुजरेगिरी चे बक्षिस म्हणून टागोरांना 1913 साली याच गीतासाठी साहित्याचे नोबेल प्राईज देण्यात आले व त्यावेळी किंग जॉर्ज 5th हा नोबेल सिलेक्शन कमीटीचा चेअरमन होता.
तथ्य काय होते
खरेतर किंग जॉर्ज 5th च्या १९११ सालच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांसोबत रामानुज चौधरी हे कवी ही उपस्थित होते व त्यांनी त्यांचे जे गीत समारंभात वाचून दाखवले ते किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले स्तुतीपर गीत होते. उपस्थित असलेल्या ब्रिटिश पत्रकारांनी बातमी लिहिताना गफलतीने टागोरांनी किंग जॉर्ज 5th साठी स्तूतीपर गीत गायले असे लिहिले व त्यामुळे टागोरांबद्दल ब्रिटीश धार्जिणे असल्याचा गैरसमज पसरला.1913 साली किंग जॉर्ज 5th Nobel Committee चा चेअरमन नसून हेराॅल्ड गैब्रिअल हा चेअरमन होता हे उपलब्ध नोंदी व कागदपत्रांवरून सिद्ध होते.
हे ही वाचा:
➡️पहिली Mumbai Local Train -उद्घाटनाला नाना शंकरशेठ हजर होते पण गव्हर्नर फॉकलंड गायब होते..



खूप छान माहिती. ज्ञानात भर पडली. 👍🏻👌🏻
धन्यवाद! Do share! जय हिंद